जेष्ठ बंधू, पत्रकार मा श्री अविनाश मुडेगावकर.
तथा भय्यासाहेब..2 आक्टोबर..!!!
तुझा वाढदिवस..!!
भय्या सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
या वर्षी आपल्या पत्रकारितेच्या यशस्वी कारकिर्दीला 22 वर्ष पूर्ण झाली. त्या बद्दल सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन..!!!
लहान भाऊ म्हणून लिहिताना खरंतर आत्तापर्यंतचा सर्वच प्रवास मला आठवतो पण त्यातील काही महत्त्वाचे प्रसंग आज नोंदवावे वाटतात..म्हणून हा छोटासा प्रयत्न..!!
चहा..!!
भैय्या तु मला नेहमी एक प्रसंग सांगायचास. 1997- 98 मध्ये जेव्हा पत्रकारितेला सुरुवात केली तेव्हा जाणतेपत्रकार आणि त्यांचे सर्व सहकारी पत्रकारांना म्हणून चेष्टा करायचे. त्या पत्रकारांच्या चर्चा सुरू असायच्या, त्यांना चेष्टेचा विषय मिळावा म्हणून ते बोलवायचे पण कधीही बसा पत्रकार साहेब आणि एक कप चहा घ्या असं कोणी म्हटलं नाही. कारण ते सर्व जण आपल्या चहात मग्न असायचे.
तू नुकतच सर्वसाक्षी चे काम सुरू केलं होतं.
या सर्व प्रसंगांवर.. तुझी एकच प्रतिक्रिया होते किती माझ्याशी असं वाटले म्हणून मी त्यांच्याशी असं वागणार नाही मी त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं काम करून दाखव दाखवणार अतिशयोक्तीचा भाग वाटायचा आज ते सत्यात उतरलेले पाहतोय.असो.
त्यानंतर तू बी.जे. आणि एम. जे. करायचं ठरवलं आणि खऱ्या अर्थाने शिक्षित पत्रकार म्हणून पूर्ण वेळ कार्य करायचे ठरवले.
पहिली बातमी..!!
संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणामधील एक रांगडे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख होती त्यांच्याविरुद्ध तू पहिली बातमी लिहिली आणि त्यानंतरचा प्रसंग खऱ्या अर्थाने तुझ्या तोंडून ऐकण्यात गंमत आहे. हा लेख वाचल्यानंतर जे लोक तुला विचारतील की काय तो प्रसंग? त्यांना तू नक्की सांगावे अशी माझी इच्छा.😊
लष्कराच्या भाकरी..!!
एम ए इंग्लिश बीएड झालेला मुलगा जेव्हा एका नामांकित संस्थेमध्ये लागलेली नोकरी सोडून आपल्या वडिलांना मला पत्रकारिता करायची आहे असं सांगतो तेव्हा त्यावर त्या वडिलांची (काकांची) काय प्रतिक्रिया असणार.?
" लष्कराच्या भाकरी भाजून पोट भरत नाही त्याला स्वतः कष्ट करावे लागतात..!!"
मला माहितीये पुढची सहा ते सात वर्षे खूप खडतर काळ होता.
अजिंठा, गावकरी, सोलापूर तरुण भारत आणि अंबाजोगाई मध्ये विवेकसिंधु अशा विविध वर्तमानपत्रांमध्ये हळूहळू तुझे लेखन सुरू झाले. याच लेखनातून तू स्वतःची एक स्वतंत्र अशी लेखन शैली विकसित केलीस. माझं वैयक्तिक मत आहे तुझ्या लेखनाला खऱ्या अर्थाने धार आली ती विवेकसिंधु मधेच..!!
याच काळात तू खऱ्या अर्थाने पत्रकार म्हणून घडताना पाहिले. अमर काका (श्री अमर हबीब) आणि गाठाळ सर (प्रा श्री नानासाहेब गाठाळ सर) यांच्या तालमीत मी खऱ्या अर्थाने घडलो असं तू नेहमी म्हणतोस. आजही तुझं त्याच्यावरील प्रेम तथा नातं हे 'पत्रकारितेच्या पलीकडचे' आहे हे मी जाणतो.
...आणि दैनिक लोकमत.
विविध वर्तमानपत्रांमध्ये काम केल्यानंतर एखाद्या प्रथितयश वर्तमानपत्राने तुझी दखल घेणे हे तुझ्या गुणवत्तेवर ते अन्यायकारक ठरले असते. नेमकी तीच बाब कदाचित लोकमत ने हेरली असेल.
लोकमत मध्ये तू काम करायला सुरुवात केलीस तेव्हा पण मी पाहिलं की तू खूप विचारपूर्वक आणि नाविन्यपूर्ण बातम्या देत असे...आजही तोच शिरस्ता अव्याहतपणे चालू आहे.
लोकमत मध्ये काम करत असताना मी तुझ्या मध्ये झालेला सर्वात मोठा बदल हा पाहिला की पत्रकार म्हणून तू कार्य खूप चांगला करत होतास पण त्याच्यासोबतच एक चांगला व्यवस्थापक, एक चांगला वक्ता, समन्वयक, विविध क्षेत्रांमधल्या संचार असा सर्वार्थाने विकसित होत गेलास व तुझा व्याप वाढतच गेला.
मी तर नेहमी तुला चेष्टेने म्हणत असतो की बाबुजींनी ( मा श्री राजेंद्रजी दर्डा) तुला दत्तक घेतले आहे. कारण मागची दहा वर्ष झाले, तू दरवर्षी कुठलया ना कुठलया पुरस्काराने सन्मानित होत असतो. त्यासोबत येणारा सत्कार आणि परत पुढील वर्षीचा सन्मान..!!
यात सोने पे सुहागा म्हणजे दोन वेळा तू थायलंड ला जाऊन आलास आणि परत आमच्या नाकावरती शेखी मिळवायला तयार, "दोन वेळा फॉरेन टूर झाली पण ते पण आमच्या कंपनीच्या खर्चाने..!! स्वतःच्या खिशातल्या एकही रुपया खर्च नाही करावा लागला नाही.
लोक स्वखर्चाने विदेशात जातात मला माझ्या स्वकर्तुत्वाने विदेश यात्रा केली."
पुरस्कार..!!
आज पर्यंत तू एकाही पुरस्कारासाठी स्वतः अर्ज केलेला नाहीस. आजपर्यंत तुला जे सन्मान मिळाले ते सर्व सन्मान तूझ्या कार्याची दखल घेतली गेली आणि तुला सन्मानित करण्यात आले. विविध सामाजिक विषयांची तुझी असलेली समज आणि त्यातून दिला जाणारा संदेश यामुळे खऱ्या अर्थाने तुझी लेखन शैली ही समाजोपयोगी ठरली.
याच लेखनशैलीची दखल घेत तुला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री अशोक राव चव्हाण यांच्या हस्ते उस्मानाबाद येथे कै. अनंत भालेराव समरती पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा राज्यस्तरीय सन्मान होता. मला चांगले आठवते या पुरस्कारासाठी आपण सहकुटुंब गेलो होतो, काकांच्या डोळ्यातला तो अभिमान आणि आनंद अश्रू आजही मला आठवतात.
तुला मिळालेले पुरस्कार..!!
१)अंबाजोगाई पत्रकार संघाचा धनंजय गद्रे पत्रकारिता पुरस्कार
२)कै.वामनराव ठाकूर प्रतिष्ठान चा पत्रकारिता पुरस्कार
3)कै. अनंत भालेराव समरती पत्रकारिता पुरस्कार हा मुख्यमंत्री यांच्या हस्ते
4)स.मा. गर्गे समरती पत्रकारिता पुरस्कार
५)यशवन्त प्रतिष्ठान च्या वतीने पत्रकारिता पुरस्कार
6)जलमित्र, पाणी फौंडेशन.
या शिवाय लोकमत च्या वतीने दिले जाणारे पुरस्कार सलग प्राप्त झाले आहेत.
का हा लेखन-प्रपंच..?
मला माहित नाही हा लेख की भावना किंवा आणखी काय ? हे याच पद्धतीने लिहीत असतात की आणखी वेगळ्या पद्धतीने? पण सहज असं वाटलं की उद्या आपल्या भावाचा वाढदिवस आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दल नक्की काय वाटतं हे थोडक्यात शब्दबद्ध करावं म्हणून हा छोटासा प्रयत्न केला..!!
भैय्या साहेब आपल्या भावी कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!
© प्रा.डॉ. गणेश अनंतराव मुडेगावकर
9421440940
तथा भय्यासाहेब..2 आक्टोबर..!!!
तुझा वाढदिवस..!!
भय्या सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
या वर्षी आपल्या पत्रकारितेच्या यशस्वी कारकिर्दीला 22 वर्ष पूर्ण झाली. त्या बद्दल सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन..!!!
लहान भाऊ म्हणून लिहिताना खरंतर आत्तापर्यंतचा सर्वच प्रवास मला आठवतो पण त्यातील काही महत्त्वाचे प्रसंग आज नोंदवावे वाटतात..म्हणून हा छोटासा प्रयत्न..!!
चहा..!!
भैय्या तु मला नेहमी एक प्रसंग सांगायचास. 1997- 98 मध्ये जेव्हा पत्रकारितेला सुरुवात केली तेव्हा जाणतेपत्रकार आणि त्यांचे सर्व सहकारी पत्रकारांना म्हणून चेष्टा करायचे. त्या पत्रकारांच्या चर्चा सुरू असायच्या, त्यांना चेष्टेचा विषय मिळावा म्हणून ते बोलवायचे पण कधीही बसा पत्रकार साहेब आणि एक कप चहा घ्या असं कोणी म्हटलं नाही. कारण ते सर्व जण आपल्या चहात मग्न असायचे.
तू नुकतच सर्वसाक्षी चे काम सुरू केलं होतं.
या सर्व प्रसंगांवर.. तुझी एकच प्रतिक्रिया होते किती माझ्याशी असं वाटले म्हणून मी त्यांच्याशी असं वागणार नाही मी त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं काम करून दाखव दाखवणार अतिशयोक्तीचा भाग वाटायचा आज ते सत्यात उतरलेले पाहतोय.असो.
त्यानंतर तू बी.जे. आणि एम. जे. करायचं ठरवलं आणि खऱ्या अर्थाने शिक्षित पत्रकार म्हणून पूर्ण वेळ कार्य करायचे ठरवले.
पहिली बातमी..!!
संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणामधील एक रांगडे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख होती त्यांच्याविरुद्ध तू पहिली बातमी लिहिली आणि त्यानंतरचा प्रसंग खऱ्या अर्थाने तुझ्या तोंडून ऐकण्यात गंमत आहे. हा लेख वाचल्यानंतर जे लोक तुला विचारतील की काय तो प्रसंग? त्यांना तू नक्की सांगावे अशी माझी इच्छा.😊
लष्कराच्या भाकरी..!!
एम ए इंग्लिश बीएड झालेला मुलगा जेव्हा एका नामांकित संस्थेमध्ये लागलेली नोकरी सोडून आपल्या वडिलांना मला पत्रकारिता करायची आहे असं सांगतो तेव्हा त्यावर त्या वडिलांची (काकांची) काय प्रतिक्रिया असणार.?
" लष्कराच्या भाकरी भाजून पोट भरत नाही त्याला स्वतः कष्ट करावे लागतात..!!"
मला माहितीये पुढची सहा ते सात वर्षे खूप खडतर काळ होता.
अजिंठा, गावकरी, सोलापूर तरुण भारत आणि अंबाजोगाई मध्ये विवेकसिंधु अशा विविध वर्तमानपत्रांमध्ये हळूहळू तुझे लेखन सुरू झाले. याच लेखनातून तू स्वतःची एक स्वतंत्र अशी लेखन शैली विकसित केलीस. माझं वैयक्तिक मत आहे तुझ्या लेखनाला खऱ्या अर्थाने धार आली ती विवेकसिंधु मधेच..!!
याच काळात तू खऱ्या अर्थाने पत्रकार म्हणून घडताना पाहिले. अमर काका (श्री अमर हबीब) आणि गाठाळ सर (प्रा श्री नानासाहेब गाठाळ सर) यांच्या तालमीत मी खऱ्या अर्थाने घडलो असं तू नेहमी म्हणतोस. आजही तुझं त्याच्यावरील प्रेम तथा नातं हे 'पत्रकारितेच्या पलीकडचे' आहे हे मी जाणतो.
...आणि दैनिक लोकमत.
विविध वर्तमानपत्रांमध्ये काम केल्यानंतर एखाद्या प्रथितयश वर्तमानपत्राने तुझी दखल घेणे हे तुझ्या गुणवत्तेवर ते अन्यायकारक ठरले असते. नेमकी तीच बाब कदाचित लोकमत ने हेरली असेल.
लोकमत मध्ये तू काम करायला सुरुवात केलीस तेव्हा पण मी पाहिलं की तू खूप विचारपूर्वक आणि नाविन्यपूर्ण बातम्या देत असे...आजही तोच शिरस्ता अव्याहतपणे चालू आहे.
लोकमत मध्ये काम करत असताना मी तुझ्या मध्ये झालेला सर्वात मोठा बदल हा पाहिला की पत्रकार म्हणून तू कार्य खूप चांगला करत होतास पण त्याच्यासोबतच एक चांगला व्यवस्थापक, एक चांगला वक्ता, समन्वयक, विविध क्षेत्रांमधल्या संचार असा सर्वार्थाने विकसित होत गेलास व तुझा व्याप वाढतच गेला.
मी तर नेहमी तुला चेष्टेने म्हणत असतो की बाबुजींनी ( मा श्री राजेंद्रजी दर्डा) तुला दत्तक घेतले आहे. कारण मागची दहा वर्ष झाले, तू दरवर्षी कुठलया ना कुठलया पुरस्काराने सन्मानित होत असतो. त्यासोबत येणारा सत्कार आणि परत पुढील वर्षीचा सन्मान..!!
यात सोने पे सुहागा म्हणजे दोन वेळा तू थायलंड ला जाऊन आलास आणि परत आमच्या नाकावरती शेखी मिळवायला तयार, "दोन वेळा फॉरेन टूर झाली पण ते पण आमच्या कंपनीच्या खर्चाने..!! स्वतःच्या खिशातल्या एकही रुपया खर्च नाही करावा लागला नाही.
लोक स्वखर्चाने विदेशात जातात मला माझ्या स्वकर्तुत्वाने विदेश यात्रा केली."
पुरस्कार..!!
आज पर्यंत तू एकाही पुरस्कारासाठी स्वतः अर्ज केलेला नाहीस. आजपर्यंत तुला जे सन्मान मिळाले ते सर्व सन्मान तूझ्या कार्याची दखल घेतली गेली आणि तुला सन्मानित करण्यात आले. विविध सामाजिक विषयांची तुझी असलेली समज आणि त्यातून दिला जाणारा संदेश यामुळे खऱ्या अर्थाने तुझी लेखन शैली ही समाजोपयोगी ठरली.
याच लेखनशैलीची दखल घेत तुला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री अशोक राव चव्हाण यांच्या हस्ते उस्मानाबाद येथे कै. अनंत भालेराव समरती पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा राज्यस्तरीय सन्मान होता. मला चांगले आठवते या पुरस्कारासाठी आपण सहकुटुंब गेलो होतो, काकांच्या डोळ्यातला तो अभिमान आणि आनंद अश्रू आजही मला आठवतात.
तुला मिळालेले पुरस्कार..!!
१)अंबाजोगाई पत्रकार संघाचा धनंजय गद्रे पत्रकारिता पुरस्कार
२)कै.वामनराव ठाकूर प्रतिष्ठान चा पत्रकारिता पुरस्कार
3)कै. अनंत भालेराव समरती पत्रकारिता पुरस्कार हा मुख्यमंत्री यांच्या हस्ते
4)स.मा. गर्गे समरती पत्रकारिता पुरस्कार
५)यशवन्त प्रतिष्ठान च्या वतीने पत्रकारिता पुरस्कार
6)जलमित्र, पाणी फौंडेशन.
या शिवाय लोकमत च्या वतीने दिले जाणारे पुरस्कार सलग प्राप्त झाले आहेत.
का हा लेखन-प्रपंच..?
मला माहित नाही हा लेख की भावना किंवा आणखी काय ? हे याच पद्धतीने लिहीत असतात की आणखी वेगळ्या पद्धतीने? पण सहज असं वाटलं की उद्या आपल्या भावाचा वाढदिवस आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दल नक्की काय वाटतं हे थोडक्यात शब्दबद्ध करावं म्हणून हा छोटासा प्रयत्न केला..!!
भैय्या साहेब आपल्या भावी कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!
© प्रा.डॉ. गणेश अनंतराव मुडेगावकर
9421440940
Share
Inspiring
ReplyDelete